बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संबंध देशावर शोककळा पसरली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना जशास तसा धडा शिकविला जावा, अशी मागणी होत आहे. तत्पूर्वी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते, आमदार संजय गायकवाड यांनी या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने वेगळीच मागणी केली आहेमनसेने हिंदी भाषा सक्तीची करण्यास विरोध दर्शविला होता. महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केल्यास आंदोलन छेडू असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे जात सुधारित शासन निर्णय काढला होता. आमदार संजय गायकवाड बुलढाणा येथे माध्यमांशी बोलत असताना त्यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी मनसेला टोला लगावताना अजब मागणी केली.संजय गायकवाड म्हणाले, “जे कोणी पक्ष किंवा लोक म्हणतात की, हिंदी शिकवली जाऊ नये. हिंदी राष्ट्रभाषा नाही. पण जर आम्ही युपी-बिहार किंवा दिल्लीमध्ये गेलो आणि तिथे मराठीशिवाय इतर कोणतीच भाषा आली नाही. तर आमच्या लोकांनी तिकडे काय करावे. आज देशात कुठेही गेला तरी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत संवाद साधला जातो. त्यामुळे हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.”उर्दू भाषाही शिकवली गेली पाहीजे“छत्रपती संभाजी महाराजांना १६ भाषा अवगत होत्या. मग तुम्ही त्यांच्या विचारांनाही लाथ मारणार आहात का? शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते. त्यांना अनेक भाषा येत होत्या. त्यांनी भाषा शिकून चूक केली का? आमच्या महाराष्ट्रातील युवक जगात कुठेही गेले तरी त्यांना जगाच्या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत. एवढेच काय, तर हिंदीबरोबर उर्दू भाषाही पहिल्या वर्गापासून शिकवली गेली पाहिजे”, अशी अजब मागणी संजय गायकवाड यांनी केली.या मागणीबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “उर्दू भाषेत अतिरेकी संदेश पाठवत असतात. पण आपल्याला उर्दू समजत नसल्यामुळे ते पकडले जात नाहीत. त्यामुळे उर्दूही शिकवली गेली पाहिजे.दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही आज एक अजब विधान केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील पर्यटकांना दिलासा देऊन परत आणण्यासाठी श्रीनगरला गेले आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हस्के म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी पर्यटकांना दिलासा दिला. त्यांना विमानतळावर आणले. अनेक पर्यटक रेल्वेने, बसने प्रवास करणारे आहेत. त्यांना शिंदेंमुळे पहिल्यांदाच विमानात बसता आले.